निवडणुकीच्या निकालानंतर रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी संजय राऊत आणि उबाठाची अवस्था होणार; त्याची रंगीत तालीम सुरू

शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा संजय राऊत व उबाठा वर हल्लाबोल


मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना सुद्धा खात्री आहे. म्हणूनच त्याची रंगीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि उबाठाने (Uddhav Thackeray) सुरू केली आहे. रोज रडक्या पोपटासारखे रडगाणे गात आहेत, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी संजय राऊत आणि उबाठा यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील।बाळासाहेब भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



विरोधकांचे बालीश विधान


राजू वाघमारे पुढे म्हणाले की, मतदानाची सर्व काळजी निवडणूक आयोग घेत असतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हजारो निवडणूककेंद्राच्या हजारो मशिन्स एकाच वेळी काम करत असतात. त्या वेळेस काही वेळा त्या बंद सुद्धा पडू शकतात. शेवटी यंत्र आहे ते. पण निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशिन्स बंद पाडण्यास सांगणे हे बालीश विधान विरोधक करताहेत, हे संजय राऊत आणि उबाठा करताहेत हे अतिशय हास्यास्पद आहे.



संजय राऊत एक भोंदू ज्योतिषी


संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊत ज्योतिषी झालेत हे मला माहित नव्हते. कारण उबाठाला जिथे मतदान होणार होते तिथे मशिन्स बंद केल्या असे आरोप आमच्यावर करत आहेत. पण कुठल्या विभागात कुणाला किती मते मिळतात हे कुणीच सांगू शकत नाही, असे असते तर निवडणुका झाल्याच नसत्या. म्हणून संजय राऊत यांची विधाने चुकीची आहेत ते एक भोंदू ज्योतिषी आहेत.


थांबलेल्या नालेसफाई बाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना राजू वाघमारे म्हणाले की, मुंबईतील नालेसफाईचे काम निवडणुकीपूर्वी महापालिकेने घेतले होते. पण आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा सुरू होईल. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास राजू वाघमारे यांनी दर्शवला.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि