निवडणुकीच्या निकालानंतर रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी संजय राऊत आणि उबाठाची अवस्था होणार; त्याची रंगीत तालीम सुरू

  166

शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा संजय राऊत व उबाठा वर हल्लाबोल


मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना सुद्धा खात्री आहे. म्हणूनच त्याची रंगीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि उबाठाने (Uddhav Thackeray) सुरू केली आहे. रोज रडक्या पोपटासारखे रडगाणे गात आहेत, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी संजय राऊत आणि उबाठा यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील।बाळासाहेब भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



विरोधकांचे बालीश विधान


राजू वाघमारे पुढे म्हणाले की, मतदानाची सर्व काळजी निवडणूक आयोग घेत असतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हजारो निवडणूककेंद्राच्या हजारो मशिन्स एकाच वेळी काम करत असतात. त्या वेळेस काही वेळा त्या बंद सुद्धा पडू शकतात. शेवटी यंत्र आहे ते. पण निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशिन्स बंद पाडण्यास सांगणे हे बालीश विधान विरोधक करताहेत, हे संजय राऊत आणि उबाठा करताहेत हे अतिशय हास्यास्पद आहे.



संजय राऊत एक भोंदू ज्योतिषी


संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊत ज्योतिषी झालेत हे मला माहित नव्हते. कारण उबाठाला जिथे मतदान होणार होते तिथे मशिन्स बंद केल्या असे आरोप आमच्यावर करत आहेत. पण कुठल्या विभागात कुणाला किती मते मिळतात हे कुणीच सांगू शकत नाही, असे असते तर निवडणुका झाल्याच नसत्या. म्हणून संजय राऊत यांची विधाने चुकीची आहेत ते एक भोंदू ज्योतिषी आहेत.


थांबलेल्या नालेसफाई बाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना राजू वाघमारे म्हणाले की, मुंबईतील नालेसफाईचे काम निवडणुकीपूर्वी महापालिकेने घेतले होते. पण आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा सुरू होईल. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास राजू वाघमारे यांनी दर्शवला.

Comments
Add Comment

SRK house Mannat Renovation: शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर अनधिकृत बांधकाम! नेमकं प्रकरण काय?

SRK house Mannat Renovation Controversy: बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आणि त्याचा मन्नत हा बंगला सध्या वादाच्या

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले; सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठी झाल्याने पाणी कपातीचे संकट टळले

रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य...

मुंबई : महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ

Maharashtra Police Constable : बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखवून मिळवली नोकरी, पोलिस शिपाई बडतर्फ...

मुंबई : राज्य सरकारने गृहविभागाअंतर्गत  २०२१ मध्ये ५३० पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती.  राज्य सरकारच्या

अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर

रिक्षात चौथी सीट बसवली तर दहा हजार रुपये दंड !

डोंबिवली : शहरात रिक्षा प्रवासात चालकाने चौथी सीट बसविल्यास त्याला दहा हजार रुपये दंड आकराला जात आहे. आधीच हातावर