मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे आहे की मुलांना प्ले स्कूलला कधी पाठवावे. योग्य वयात प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांना अधिक फायदे होतात.


जसजशी मुले मोठी होतात तसे पालक आपल्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे तसेच शाळेत जाण्याला त्रास होऊ नये.


मुले जेव्हा व्यवस्थित चालायला तसेच बोलायला आणि एकमेकांमध्ये मिसळायला लागतील तेव्हा प्ले स्कूलला पाठवले पाहिजे. अधिकतर मुलांच्या मेंदूचा ९० टक्के विकास वयाच्या ५ वर्षांपर्यंत होत असतो. या कालावधीत ते लवकर शिकतात आणि नवनवे अनुभव तयार करतात. तुम्ही त्यांना वयाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात पाठवू शकता.


प्ले स्कूलमध्ये मुले एकमेकांशी मिसळून वागायला शिकतात. तसेच त्यांचा सामाजिक विकास चांगला होतो. प्ले स्कूलमध्ये मुले आपल्या भावना समजतात तसेच व्यक्त करणे शिकतात. हे त्यांच्या भावनात्मक विकासासाठी गरजेचे असते. तसेच शाळेत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीजही असतात ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुले नवनव्या गोष्टी शिकतात. यामुळे त्यांचा मानसिक विकासही व्यवस्थित होतो.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे