निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु (Terrorist Attack in Kashmir) आहे. शनिवारी रात्री येथे एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शोपियानच्या हिरपोरा भागात दहशतवाद्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. तर दुस-या हल्ल्यात एका जोडप्यावर गोळीबार केला. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राजस्थानमधील जयपूर येथून अनंतनाग जिल्ह्यातील हिरपोरा भागात आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. पहलगाम येथील एका तंबूत ते थांबले होते. तंबूतून बाहेर येताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केल्याचे सांगण्यात आले.


या हल्ल्यानंतर काही वेळातच दुसरा हल्ला झाला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी माजी सरपंच एजाज शेख यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर अनंतनाग आणि शोपियान भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च