UP Crime news : केवळ १३ वर्षांच्या मुलीने आपल्या दोन लहान बहिणींची गळा आवळून केली हत्या!

हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले


लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी घेणारी घरातील जवळची ही मोठी भावंडंच असतात. मात्र, याच भावाबहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. भावंडांमधील सगळ्यात मोठ्या बहिणीने आपल्या दोन लहान बहिणींचा गळा आवळून जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, ही मोठी बहिण केवळ १३ वर्षांची होती. तपासादरम्यान हे लक्षात आल्याने पोलीस हादरले. लहान बहिणींच्या हत्येचे तिने सांगितलेले कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.


एसीपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेबाराच्या सुमारास नूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गौहावर जैत गावात दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळाली. दोन मृत मुलींचं वय ७ आणि ५ वर्षे होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना तेथील एका घरात सहदेव आणि सविता यांच्या सात आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले.


सहदेव आणि सविता त्यांच्या ५ मुलांसह या घरात राहत होते. सविताने दोनदा लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न पुखराज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सविताची मोठी मुलगी (१३) आणि तिची धाकटी मुलगी (९) या पुखराजच्या मुली आहेत. ज्या दोन मुलींची हत्या करण्यात आली त्या सविताचा दुसरा पती सहदेव यांच्या मुली होत्या. याशिवाय सविता आणि सहदेव यांना दीड वर्षांचा मुलगाही आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३ वर्षांच्या मोठ्या मुलीची चौकशी केली.


पोलीस चौकशीत सुरुवातीला मोठ्या मुलीने सांगितलं की, दोन अनोळखी लोक घरात आले आणि त्यांनी दोन्ही बहिणींचा गळा दाबून खून केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. नंतर मात्र मोठ्या बहिणीने तिने दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं कबूल केलं. मोठ्या मुलीने सांगितलं की, वडील मोठं कुटुंब असल्याने चिंतेत होते, म्हणून तिने दोन्ही बहिणींची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. दोन्ही मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या