Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; 'या' ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

  102

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन बनतील. महाराष्ट्रातील सुंदर डोंगररांगांमध्ये अशी अनेक मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणूनच, आज तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.



१.लोणावळा / खंडाळा-पुणे :- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली हिरवीगार वन्य शोभा,डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे धबधबे हे मनाला मोहून टाकणारे आहेत. पावसाळ्यात इथले सौंदर्य बहरून जाते.



२.ताम्हिणी घाट :- गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरावरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच ३० किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.



३.माळशेज घाट :- पावसाळ्यात महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचा उल्लेख नक्कीच होतो. समुद्रसपाटीपासून ७ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि ट्रेकर्स प्रेमींमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात सर्वत्र हिरवळ असते. पावसाळ्यात येथील पर्वत ढगांनी झाकलेले असतात. थंड हवेच्या झुळूकांमध्ये अनेक ठिकाणी सुंदर धबधबेही पाहायला मिळतात.



४.पाचगणी :- पाचगणी हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पाच टेकड्यांनी वेढलेले अतिशय सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेले असल्याने पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अगदी नयनरम्य असते. पाचगणी हिल स्टेशन विशेषतः पावसाळ्यात निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना आकर्षित करते.



५.इगतपुरी :- इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने प्रत्येकाला निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.



६.भीमाशंकर :- पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अभयारण्य समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक