Manoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. दौऱ्यादरम्यान वाढत्या उन्हामुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे या मागणीचे नेतृत्व करत आहेत. या मागणीबाबत मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत. मात्र अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना हा दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचारांकरीता दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सतत होणारे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.