Pune Crime : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत! २२ वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

  107

मध्यरात्री नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली असून दिवसेंदिवस पुण्यातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कधी खून, कधी गोळीबार, कधी कोयता हल्ला यामुळे पुणे पार हादरून गेलं आहे. या सगळ्या घटना किरकोळ वादातून होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. त्यातच पुण्यात पुन्हा एकदा कोयता हल्ल्याची घटना घडली आहे. कोथरुड (Kothrud) परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गँगच्या (Koyta gang) टोळक्याने २२ वर्षीय तरुणाची हत्या करत खळबळ उडवून दिली आहे.


पुण्यातील कोथरूड परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोथरुड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं?


श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता. त्याचवेळी कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं आणि श्रीनिवासवर जोरदार वार करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला. श्रीनिवासवर करण्यात आलेले वार इतके जोरात होते की, श्रीनिवास रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.


रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्यांची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. रात्री त्याच्यासोबत असलेल्या मित्राची देखील पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या