Pune Crime : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत! २२ वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

मध्यरात्री नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली असून दिवसेंदिवस पुण्यातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कधी खून, कधी गोळीबार, कधी कोयता हल्ला यामुळे पुणे पार हादरून गेलं आहे. या सगळ्या घटना किरकोळ वादातून होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. त्यातच पुण्यात पुन्हा एकदा कोयता हल्ल्याची घटना घडली आहे. कोथरुड (Kothrud) परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गँगच्या (Koyta gang) टोळक्याने २२ वर्षीय तरुणाची हत्या करत खळबळ उडवून दिली आहे.


पुण्यातील कोथरूड परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोथरुड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं?


श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता. त्याचवेळी कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं आणि श्रीनिवासवर जोरदार वार करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला. श्रीनिवासवर करण्यात आलेले वार इतके जोरात होते की, श्रीनिवास रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.


रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्यांची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. रात्री त्याच्यासोबत असलेल्या मित्राची देखील पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


Comments
Add Comment

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग