Weather Update : 'या' भागात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

तर मुंबईत 'असं' असेल वातावरण


मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं आहे. अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मुंबईत टॉवर, होर्डिंग, पूल कोसळ्याच्या घटना घडल्या तर बंगळूरमध्ये चक्क २७०हून अधिक झाडं कोसळ्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. राज्यात या अवकाळी पावसाने चांगलच रौद्र रुप दाखवलं आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) बंगळूर शहराला सावधानतेचा इशारा दिला आहे.


उत्तर भारतात मे महिन्यातील कडाकाच्या उन्हानं नागरिकांची लाही-लाही होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) आज वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.



१६ ते २१ मेपर्यंत यलो अलर्ट


१६ मे ते २१ मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. १६, १७ आणि १९ मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं. तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.



मुंबईतील परिस्थिती काय?


तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. आजदेखील ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.



जागतिक स्तरावरही तापमानात वाढ


जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस' आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा