Dry Day In Maharashtra : तळीरामांसाठी मोठी बातमी! मुंबईत सलग तीन दिवस 'ड्राय डे’

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?


मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) अखेरचा टप्पा चालू आहे. २० मे रोजी मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) होत आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात मुंबईसह प्रशासनाने सलग तीन दिवस ड्राय-डे ची घोषणा केली आहे. या काळात मुंबईसह इतर परिसरातील सर्व दारुची दुकाने, आस्थापना बंद असणार आहेत. त्यामुळे काही दिवस मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे.



महाराष्ट्रात तीन दिवस ‘ड्राय डे’


सोमवार २० मे रोजी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार ते पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे या महाराष्ट्रातील प्रमुख मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये देखील ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.


भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार, ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि नजीकच्या मतदारसंघांनी ‘ड्राय डे’ पाळणे आवश्यक आहे.



या दिवशी दारूची दुकाने बंद राहणार


मुंबई शहरात १८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद असणार आहेत. त्यानंतर, १९ मे रोजी दिवसभर बंद राहतील आणि २० मे रोजी सायंकाळी ५ नंतर उघडतील. तसेच ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मुंबईत पुन्हा ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील

Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता