Crime : इंस्टाग्राम रिल्समुळे दोन बहिणी गजाआड! तब्बल ५५ लाखांच्या चोरीची तक्रार

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


मुंबई : इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंड बनला आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका दाम्पत्याने त्याच्या घरात तब्बल ५५ लाखांची चोर झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्याच घरात काम करणाऱ्या दोन मुलींनी चोरी केली असल्याचा संशय दाम्पत्याने सांगितला. संशयानुसार पोलिसांनी दोन्ही मुलींवर कडक नजर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. पोलिसांना या वृद्ध माणसाकडून कळले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रिल्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती. दरम्यान, पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला.


छाया वेतकोली (२४) आणि भारती वेतकोली (२१) असे या दोन्ही मुलींचे नाव असून त्यांनी चोरीचे दागिने आणि कपडे घालून रील्स बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. पोलिसांनी इनवेस्टिगेशन करताना या मुलींचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकेशन ट्रेस केलं. त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं. तातडीने पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले.


दरम्यान, या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ (कारकून किंवा नोकराकडून चोरी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये