प्रहार    

Crime : इंस्टाग्राम रिल्समुळे दोन बहिणी गजाआड! तब्बल ५५ लाखांच्या चोरीची तक्रार

  106

Crime : इंस्टाग्राम रिल्समुळे दोन बहिणी गजाआड! तब्बल ५५ लाखांच्या चोरीची तक्रार

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई : इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंड बनला आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका दाम्पत्याने त्याच्या घरात तब्बल ५५ लाखांची चोर झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्याच घरात काम करणाऱ्या दोन मुलींनी चोरी केली असल्याचा संशय दाम्पत्याने सांगितला. संशयानुसार पोलिसांनी दोन्ही मुलींवर कडक नजर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. पोलिसांना या वृद्ध माणसाकडून कळले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रिल्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती. दरम्यान, पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला.

छाया वेतकोली (२४) आणि भारती वेतकोली (२१) असे या दोन्ही मुलींचे नाव असून त्यांनी चोरीचे दागिने आणि कपडे घालून रील्स बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. पोलिसांनी इनवेस्टिगेशन करताना या मुलींचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकेशन ट्रेस केलं. त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं. तातडीने पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले.

दरम्यान, या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ (कारकून किंवा नोकराकडून चोरी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे