छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा तडाखा बसत असून मराठवाड्याला (Marathwada) याचा भीषण फटका बसत आहे. मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले तर दुसरीकडे मराठवाड्यात धरणे आटल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हवामानाची स्थिती बदलली असून कधी ऊन, कधी पाऊस याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे.
मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याविना शेततळी सुकली आहेत. तर ग्रामीण भागातील स्त्रिया दिवसभर पाणी कसं पुरवायचं याचे नियोजन करताना दिसत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जालना : ४८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बीड : ३८२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणी : ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड : १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
धाराशिव : १३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
लातूर : २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर्सची गरज निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यातील १२४ घरं असलेल्या अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येतं. या गावाच्या घराघरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. या ड्रमची संख्या जवळपास ५०० आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…