Water Shortage : मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष! शेततळे, विहिरी, धरणे पडली कोरडी

  120

आशिया खंडातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर्सची गरज


छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा तडाखा बसत असून मराठवाड्याला (Marathwada) याचा भीषण फटका बसत आहे. मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले तर दुसरीकडे मराठवाड्यात धरणे आटल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हवामानाची स्थिती बदलली असून कधी ऊन, कधी पाऊस याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे.


मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याविना शेततळी सुकली आहेत. तर ग्रामीण भागातील स्त्रिया दिवसभर पाणी कसं पुरवायचं याचे नियोजन करताना दिसत आहेत.



कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणीपुरवठा?


छत्रपती संभाजीनगर : ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जालना : ४८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बीड : ३८२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणी : ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड : १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
धाराशिव : १३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
लातूर : २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.



आठ दिवसाला एक टँकर


छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर्सची गरज निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यातील १२४ घरं असलेल्या अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येतं. या गावाच्या घराघरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. या ड्रमची संख्या जवळपास ५०० आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत