Vegetable price hike : गृहिणींचं टेन्शन वाढणार; सगळ्या भाज्यांचा जोडीदार बटाटा आणखी महागणार!

  57

भाजीपाल्यांच्या वाढत्या किंमतीमुळे व्हेज थाळीही महागली


मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेला खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच अनेक सवलती, दर कमी होणे अशा गोष्टींना उधाण आले आहे. मात्र, काही गोष्टी महाग होण्यापासून रोखणे सरकारलाही कठीण होऊन बसले आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं व सर्वसामान्यांचं टेन्शनही वाढलं आहे. भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: बटाट्याच्या दरात (Potato Price) मोठी वाढ झाली आहे.


बटाटा म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कोणत्याही भाजीत बटाटा घातला की त्याची चव वाढते. असा सगळ्या भाज्यांचा जोडीदारच महागल्याने बटाटा विकत घ्यायचा की नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. एका बाजूला उष्णतेचा कहर आहे, तर काही बाजूला अवकाळी पाऊस या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे बटाटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे.



टोमॅटोच्या दरात घट तर बटाट्याच्या दरात वाढ


दिल्लीतील आझादपूरची बाजारपेठ अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. तर बटाट्याचे भाव अजूनही चढेच आहेत. बटाट्याच्या दरात आणखी ५ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



आणखी पाच सहा महिने भाव चढेच राहणार


दरम्यान, बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत कमी प्रमाणात बटाटा बाजारात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बटाट्याचे पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी पाच सहा महिने बटाट्याचे दर वाढलेलेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बटाटा आणि भाजीपाल्याच्या किंमती वाढत असल्यामुळे व्हेज थाळीही महाग होत आहे.


Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.