Vegetable price hike : गृहिणींचं टेन्शन वाढणार; सगळ्या भाज्यांचा जोडीदार बटाटा आणखी महागणार!

भाजीपाल्यांच्या वाढत्या किंमतीमुळे व्हेज थाळीही महागली


मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेला खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच अनेक सवलती, दर कमी होणे अशा गोष्टींना उधाण आले आहे. मात्र, काही गोष्टी महाग होण्यापासून रोखणे सरकारलाही कठीण होऊन बसले आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं व सर्वसामान्यांचं टेन्शनही वाढलं आहे. भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: बटाट्याच्या दरात (Potato Price) मोठी वाढ झाली आहे.


बटाटा म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कोणत्याही भाजीत बटाटा घातला की त्याची चव वाढते. असा सगळ्या भाज्यांचा जोडीदारच महागल्याने बटाटा विकत घ्यायचा की नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. एका बाजूला उष्णतेचा कहर आहे, तर काही बाजूला अवकाळी पाऊस या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे बटाटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे.



टोमॅटोच्या दरात घट तर बटाट्याच्या दरात वाढ


दिल्लीतील आझादपूरची बाजारपेठ अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. तर बटाट्याचे भाव अजूनही चढेच आहेत. बटाट्याच्या दरात आणखी ५ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



आणखी पाच सहा महिने भाव चढेच राहणार


दरम्यान, बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत कमी प्रमाणात बटाटा बाजारात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बटाट्याचे पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी पाच सहा महिने बटाट्याचे दर वाढलेलेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बटाटा आणि भाजीपाल्याच्या किंमती वाढत असल्यामुळे व्हेज थाळीही महाग होत आहे.


Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला