PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या रोड-शोमुळे मुंबईत मेट्रो बंद!

सुरक्षेच्या कारणास्तव घेतली खबरदारी


मुंबई : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. अशातच निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले असून आता पाचव्या टप्प्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे.


या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज सायंकाळी रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक - घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Comments
Add Comment

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने