PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या रोड-शोमुळे मुंबईत मेट्रो बंद!

सुरक्षेच्या कारणास्तव घेतली खबरदारी


मुंबई : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. अशातच निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले असून आता पाचव्या टप्प्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे.


या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज सायंकाळी रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक - घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Comments
Add Comment

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये