Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून रचला हत्येचा कट! गोळीबारही केला पण...

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं (Pimpri Chinchwad Crime) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणाहून सातत्याने गोळीबाराच्या (Firing) घटना समोर येत आहेत. कधीकधी क्षुल्लक कारणावरुनही थेट गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शहरामधील चिखली परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकवर थेट गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने गोळी दंडाला लागल्याने त्याचा जीव वाचला आहे.


चिखलीतील या धक्कादायक घटनेत अजय सुनील फुले (वय १९, रा. मोहननगर, चिंचवड) आणि हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. यामध्ये सुदैवाने अजयचा जीव वाचला पण तो जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलला अटक केली आहे. त्याच्या सह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.


अजय फुलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.



नेमकी कशी घडली घटना?


संबंधित घटनेतील अजय व हर्षल या दोघांचाही गॅस शेगडीचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होते. त्यातच अजयला संपवण्याचा विचार हर्षलच्या डोक्यात आला आणि यासाठी त्याने त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. श्याम चौधरी आणि कीर्तीकुमार लिलारे हे हर्षलचे दोन मित्र अजयच्या दुकानात वाद मिटवण्यासाठी गेले होते. मात्र, तेव्हाच हर्षलही त्या ठिकाणी आला आणि त्याने थेट पिस्तुल काढून तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली तर दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. या प्रकरणी हर्षल आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी