Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून रचला हत्येचा कट! गोळीबारही केला पण...

  60

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं (Pimpri Chinchwad Crime) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणाहून सातत्याने गोळीबाराच्या (Firing) घटना समोर येत आहेत. कधीकधी क्षुल्लक कारणावरुनही थेट गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शहरामधील चिखली परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकवर थेट गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने गोळी दंडाला लागल्याने त्याचा जीव वाचला आहे.


चिखलीतील या धक्कादायक घटनेत अजय सुनील फुले (वय १९, रा. मोहननगर, चिंचवड) आणि हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. यामध्ये सुदैवाने अजयचा जीव वाचला पण तो जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलला अटक केली आहे. त्याच्या सह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.


अजय फुलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.



नेमकी कशी घडली घटना?


संबंधित घटनेतील अजय व हर्षल या दोघांचाही गॅस शेगडीचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होते. त्यातच अजयला संपवण्याचा विचार हर्षलच्या डोक्यात आला आणि यासाठी त्याने त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. श्याम चौधरी आणि कीर्तीकुमार लिलारे हे हर्षलचे दोन मित्र अजयच्या दुकानात वाद मिटवण्यासाठी गेले होते. मात्र, तेव्हाच हर्षलही त्या ठिकाणी आला आणि त्याने थेट पिस्तुल काढून तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली तर दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. या प्रकरणी हर्षल आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित