Mahavikas Aghadi : चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली हकालपट्टी!

  154

मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून मविआतील (Mahavikas Aghadi) धुसफूस कायम बाहेर येत राहिली आहे. त्यातच आता मतदान शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असतानाही मविआत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे (Thackeray Group) उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले.


ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली.


हा नेमका वाद काय किंवा अनिल देसाईंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हा वाद जुना असून त्यातूनच ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल.


Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी