Jackie Shroff : 'भिडू' शब्दावरुन जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव!

नेमकं प्रकरण काय?


नवी दिल्ली : अभिनेते किंवा अभिनेत्री आपल्या एखाद्या डायलॉगने किंवा स्टाईलने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा एखादा डायलॉग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतो आणि कालांतराने तीच त्यांची ओळख बनून जाते. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचीही (Jackie Shroff) स्टाईल खूप फेमस आहे. जॅकी श्रॉफ हा आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. त्याची बोलण्याचीही एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळेच जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा (Bollywood actors) वेगळा ठरतो. मात्र, या स्टाईल आणि भिडू शब्दामुळे जॅकीने दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) धाव घेतली आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय...


जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्या खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया आणि एआय ॲप्सशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी जॅकीने केली आहे.


जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेवर आता १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेनुसार, पॅरोडी, विडंबनात्मक कलाकृतीसाठी आपला आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर करण्यास मनाई नाही. मात्र, चुकीच्या गोष्टींसाठी, बदनामीकारक कंटेंट तयार करण्यासाठी आपल्या आवाजाचा, व्यक्तिमत्त्वाचा वापर होता कामा नये असे जॅकी श्रॉफने म्हटले आहे.



अमिताभ बच्चन यांनीही याचिका दाखल केली आहे


दरम्यान, अशी याचिका दाखल करणारा जॅकी श्रॉफ हा पहिला अभिनेता नाही, याआधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही आपल्या अधिकारांच्या संरक्षणाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यांनी २०२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो, नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाशी निगडीत गोष्टी वापरण्यास मनाई करावी अशी मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अंतरिम आदेश जारी केला होता.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी