Gold and silver Rate : खूशखबर! ग्राहकांची लगबग; सोनं-चांदीच्या दरात झाली घसरण

  55

जाणून घ्या आजचे दर काय?


मुंबई : सध्या देशभरात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होत असते. त्यातच सोनं-चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला होता. मात्र आता सोनं चांदींचे दागिने खरेदी करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी मिळत आहे. सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गगनाला भिडत असणारे हे सोनं-चांदीचे दर उतरत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या सध्याचे सोनं चांदीचे काय आहेत दर .


मिळालेल्या माहितीनुसार, आज भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. भारतीय वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या दरात ४३० रुपयांची घट झाली आहे. प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ७२,८२० रुपये इतका आहे. मागील सत्रात सोन्याचा दर ७३,२५० वर बंद झाला होता. तर, आज चांदीच्या दरात मात्र ५०१ रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा दर एक किलोसाठी ८५,३८७ रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर, मागील सत्रात तो ८४,८८६ रुपये इतका होता.



मुंबई - पुण्यातील सोन्याचे दर



  • २२ कॅरेट - ६६,७५० रुपये

  • २४ कॅरेट - ७२,८२० रुपये

  • १८ कॅरेट - ५४,६२० रुपये

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक