Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१ तर ठाण्यात २० रुग्ण


मुंबई : जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रादूर्भाव वाढला आहे. यापूर्वी जेएन १ व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता केपी २ व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. ताज्या माहितीनुसार, या व्हेरियंटने राज्यातही पाय पसरले आहेत. महाराष्ट्रात कोविड-१९ उप-प्रकारचे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे कोव्हिड १९ ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट केपी.२ आहे.


देशात सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराच्या राजकीय तोफा धडाडत असताना आरोग्य विभाग मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला थांबविण्यासाठी व्यस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आलेत, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण तसेच उर्वरित महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता.


महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग को-ऑर्डिनेटर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण, लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे आणि ठाणे सोडून सात रुग्ण अमरावती आणि औरंगाबादमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबईमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या