Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१ तर ठाण्यात २० रुग्ण


मुंबई : जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रादूर्भाव वाढला आहे. यापूर्वी जेएन १ व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता केपी २ व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. ताज्या माहितीनुसार, या व्हेरियंटने राज्यातही पाय पसरले आहेत. महाराष्ट्रात कोविड-१९ उप-प्रकारचे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे कोव्हिड १९ ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट केपी.२ आहे.


देशात सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराच्या राजकीय तोफा धडाडत असताना आरोग्य विभाग मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला थांबविण्यासाठी व्यस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आलेत, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण तसेच उर्वरित महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता.


महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग को-ऑर्डिनेटर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण, लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे आणि ठाणे सोडून सात रुग्ण अमरावती आणि औरंगाबादमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबईमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद