ठाणे : मे महिना आणि उकाडा हे समीकरण असताना यंदा मात्र मे महिन्यातच वरुणराजाने बरसायला सुरुवात केली आहे. अगदी कालपर्यंत प्रचंड गरमी जाणवत असतानाच आज मात्र वांगणी, बदलापूर, कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक, पालघर, ठाण्यातही पाऊस पडत आहे. यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी आहे.
पुणे, सातारा घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरच्या परिसरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तास साधारणपणे ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे परिसरात जोरदार पाऊस पडत असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ देखील वातावरणात पसरली आहे.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…