Tushar Shewale : काँग्रेसला आणखी एक भगदाड! नाशिकच्या माजी जिल्हाध्यक्षांनी ठोकला रामराम

  95

राजीनामा देत सांगितले 'हे' कारण


शेकडो कार्यकर्त्यांसह आज केला भाजपामध्ये प्रवेश


धुळे : निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Constituency) काँग्रेसच्या अडचणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाला प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. काँग्रेसचा चेहरा मानल्या जाणाऱ्या बड्या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असताना अशातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस नेते तुषार शेवाळे (Dr.Tushar Shewale) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नाशिकमधील माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आज भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश पार पडला. तुषार शेवाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात (BJP) यावेळी प्रवेश केला.
काँग्रेस नेते तुषार शेवाळे हे मालेगाव लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसतर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉ. तुषार शेवाळे हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर आज त्यांनी भाजपा प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.



ते नेमकं काय म्हणाले?


"माझा मित्रपरिवार मोठा आहे. असंख्य कार्यकर्ते आहेत. ही सर्व मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे. माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी पक्ष सोडला," अशी प्रतिक्रिया यावेळी तुषार शेवाळे यांनी दिली. दरम्यान, तुषार शेवाळे यांनी अचानक काँग्रेसची साथ सोडल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक