PM Narendra Modi : भाजपाला विजयाची खात्री असतानाही राज ठाकरे यांना सोबत घेतले कारण...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला खुलासा


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) अनेक पक्षांमध्ये चुरस असली तरी महाराष्ट्रात ही लढत मुख्यत्वे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपाने एकत्र सरकार स्थापन केले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्तेत सामील करुन घेण्यात आले.


त्यानंतर आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा दर्शवला. मात्र, त्यामुळे भाजपाला विजयाची पूर्ण खात्री असताना इतक्या पक्षांना सोबत का घेतले गेले, असा प्रश्न उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या एन्ट्रीवर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्यामागे काय कारण आहे, याचा त्यांनी खुलासा केला आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत. मी आधी सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षापासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते, असे मोदींनी म्हटले.


आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर राज ठाकरेंचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुतः देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू, असे मोदींनी स्पष्ट केले.



महायुतीसाठी राज ठाकरे यांच्या जाहीर सभा


लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. मात्र, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेण्यास राज ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील कणकवली, पुणे या दोन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या असून आज कल्याणमध्ये राज यांनी सभा होत आहे. कल्याणमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व ठाण्यातील नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.