Sitapur Murder Case : धक्कादायक! तरुणाने स्वत:च्याच कुटुंबियांची केली घृणास्पद हत्या

आईवर गोळ्या झाडून, पत्नीला हातोड्याचा मार तर मुलांना गच्चीवरून फेकले!


सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात आज पहाटे हृदयद्रावक घटना घडली. एका तरुणाने स्वत:च्याच घरातल्यांची घृणास्पद हत्या केल्याची घटना मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापुरात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने पाच जणांची निर्घृण हत्या करत स्वत:चाही जीव घेतला.


मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मतिमंद व्यक्तीने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. या तरुणाने आईला गोळी मारली, पत्नीला हातोड्याने मारहाण करत तिची हत्या केली आणि त्यानंतर मुलांनाही छतावरुन खाली फेकून त्यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं घडलं काय?


मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापुरात ही घटना घडली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण मानसिकरीत्या आजारी होता आणि घटनेच्या दिवशी तो खूप दारू प्यायला होता. काल रात्री त्याने आधी आपल्या मुलांना गच्चीवरून फेकून दिले, नंतर आईला गोळ्या घातल्या व पत्नीला हातोड्याने बेदम मारहाण करत तिची हत्या केली.


या हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून स्थिर नव्हती. आरोपी अनुराग सिंहने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियांका सिंग (४०), मुलगी अश्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी अरना यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

Comments
Add Comment

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट