RBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या वर्षात अनेक बँकांकडून विविध बदल करुन नवी नियमावली जाहीर केली जात होती. अशातच हे नवे आर्थिक वर्ष भारत सरकारसाठी चांगले ठरत आहे. या नवीन आर्थिक वर्षात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ होणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मिळालेल्या लाभांशाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अहवालानुसार आरबीआयकडून या आर्थिक वर्षात सरकारला १ लाख कोटी रुपये मिळणार आहेत. (RBI Dividend Payment)



युनियन बँकेच्या अहवालात नेमकं काय म्हटलं?


युनियन बँक ऑफ इंडियाने एक अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिझर्व्ह बँक सरकारला १ लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा हा लाभांश जास्त असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात ८७ हजार ४०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. यावर्षी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



रिझर्व्ह बँकेला 'इतका' व्याज मिळू शकतो


रिझर्व्ह बँकेचे मुख्य उत्पन्न हे व्याज आणि परकीय चलनातून होते. रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदातील सुमारे ७० टक्के रक्कम परकीय चलन संपत्तीच्या स्वरूपात आहे, तर २० टक्के सरकारी रोख्यांच्या स्वरूपात आहे. या सिक्युरिटीजमधून रिझर्व्ह बँकेला १.५ लाख कोटी ते १.७ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान व्याज मिळू शकते, असा अंदाज अहवालात दिला आहे.


Comments
Add Comment

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती