RBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

  49

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या वर्षात अनेक बँकांकडून विविध बदल करुन नवी नियमावली जाहीर केली जात होती. अशातच हे नवे आर्थिक वर्ष भारत सरकारसाठी चांगले ठरत आहे. या नवीन आर्थिक वर्षात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ होणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मिळालेल्या लाभांशाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अहवालानुसार आरबीआयकडून या आर्थिक वर्षात सरकारला १ लाख कोटी रुपये मिळणार आहेत. (RBI Dividend Payment)



युनियन बँकेच्या अहवालात नेमकं काय म्हटलं?


युनियन बँक ऑफ इंडियाने एक अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिझर्व्ह बँक सरकारला १ लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा हा लाभांश जास्त असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात ८७ हजार ४०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. यावर्षी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



रिझर्व्ह बँकेला 'इतका' व्याज मिळू शकतो


रिझर्व्ह बँकेचे मुख्य उत्पन्न हे व्याज आणि परकीय चलनातून होते. रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदातील सुमारे ७० टक्के रक्कम परकीय चलन संपत्तीच्या स्वरूपात आहे, तर २० टक्के सरकारी रोख्यांच्या स्वरूपात आहे. या सिक्युरिटीजमधून रिझर्व्ह बँकेला १.५ लाख कोटी ते १.७ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान व्याज मिळू शकते, असा अंदाज अहवालात दिला आहे.


Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके