Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला 'त्या' व्हायरल फोटोमागील खुलासा

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ?


दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय फायद्यासाठी नेत्यांची पक्षांतरेही सुरु आहेत. त्यातच नाशिकमधील (Nashik) दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. एका फोटोमध्ये ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांसोबत दिसून आल्याने ते शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाणार की काय, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या फोटोबाबत आता खुद्द नरहरी झिरवाळ यांनी खुलासा केला आहे. मी कुठेही जाणार नसून अजितदादांसोबतच कायम आहे, असं ते म्हणाले आहेत.


नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी भगरे यांचा प्रचार करत असल्याची चुकीची बातमी फोटोच्या माध्यमातून पसरवली गेली. त्यामागची खरी कहाणी वेगळी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भास्कर भगरे यांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रहा खातर मी आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर आहेत त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसलो.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,