Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला 'त्या' व्हायरल फोटोमागील खुलासा

  128

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ?


दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय फायद्यासाठी नेत्यांची पक्षांतरेही सुरु आहेत. त्यातच नाशिकमधील (Nashik) दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. एका फोटोमध्ये ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांसोबत दिसून आल्याने ते शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाणार की काय, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या फोटोबाबत आता खुद्द नरहरी झिरवाळ यांनी खुलासा केला आहे. मी कुठेही जाणार नसून अजितदादांसोबतच कायम आहे, असं ते म्हणाले आहेत.


नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी भगरे यांचा प्रचार करत असल्याची चुकीची बातमी फोटोच्या माध्यमातून पसरवली गेली. त्यामागची खरी कहाणी वेगळी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भास्कर भगरे यांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रहा खातर मी आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर आहेत त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसलो.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या