Ajit Pawar : अजित पवारांची 'दादागिरी'

'छाती फाडली की मरून जाशील' आणि 'तु किस झाड की पत्ती'


बीड : छाती फाडली की मरून जाशील स्वत:ला हनुमान समजायला लागला? माझ्या नादी कुणी लागत नाही. तु कसा आमदार होतो हे मी बघतो. माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी चांगला बंदोबस्त केला आहे, अशा गावरान भाषेत विरोधकांचा समाचार घेणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांची पळता भुई थोडी करुन टाकली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उदयनराजे भोसले यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुती आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांना चांगलाच दम दिला.


यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्या पंकजाताईंच्या विरोधात बजरंगा उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. ती कॅपॅसिटी मी वाढवून देत नव्हतो. मात्र धनंजय मुंडेंनी ते वाढवून द्यायला लावली. मी सांगितलं होतं काही गोष्टींची वेसन हातात ठेवावी लागते. कारण मी राजकारणात ३५ वर्ष घासली आहे.


मला माहिती होतं. पण कधी कधी आमच्या धनु भाऊला माणसंच कळत नाही. त्यामुळे गाडी बिघडते. त्यामुळे तुम्ही माझा सल्ला घेत जा. तर हाच बजरंगा म्हणायचा छाती फाडली की, हे दिसेल ते दिसेल. पण छाती फाडली की मरून जाशील कोण दिसेल? हनुमानाने छाती फाडलेली वेगळी. तसेच बार्शी आणि बीडमध्ये त्याचे कारखाने चालू होते. मात्र त्याला काय अवदसा आठवली काय माहिती. पण एकदा पराभूत झालेला असतानाही पुन्हा एकदा उभा राहिला. कारण पैसा आल्यानंतर मस्ती येतेच. त्यामुळे इतके दिवस माझ्याबरोबर राहिला. आता मला सोडलं. त्यामुळे मी सर्व काही देऊन जो मला सोडू शकतो, तो जनतेलाही सोडू शकतो. हा पठ्ठ्या स्वतःही पडणार आणि मुलीलाही ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत निवडून आणता येईना, अशी त्याची अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले.


त्याआधी “तु कसा आमदार होतो हे मी बघतो” हे वाक्य त्यांनी विजय शिवतारेंना वापरले होते. ते आजही कायम चर्चेत असते. त्याचवेळी काल झालेल्या पारनेर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी पुन्हा दम भरण्याची भाषा वापरली. महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले “महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है,” अशा शब्दांत अजित पवारांनी लंके यांना दम भरला.


अजित पवार म्हणाले मला इथ आल्यानंतर कानावर आलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. तसंच, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भर सभेतून दमदाटी केली जात आहे. हे असं होत असेल तर “निलेश लंके तु ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे” असा डायलॉगही अजित पवारांनी यावेळी मारला. तसंच, “माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागणाऱांचा मी चांगला बंदोबस्त केला आहे” अशा शब्दांत त्यांनी लंके यांना भर सभेत दम दिला.

Comments
Add Comment

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले