SSC HSC Result : उत्तरपत्रिका तपासण्याकडे बोर्डाचं बारीक लक्ष; यावेळी लागणार कठीण निकाल?

  75

'या' दिवशी दहावी व बारावीचे निकाल होणार जाहीर


पुणे : वाढत्या महागाईमुळे बोर्डाने दहावी बारावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बातमी ज्वलंत असतानाच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी माहिती हाती लागली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Education) १०वी, १२वीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली. यानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागले असून बोर्डाने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली आहे. (SSC HSC Result 2024)


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे निकाल मे महिन्यातच लागणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.



'या' तारखेला लागणार निकाल


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल येत्या २० मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.



असा पाहा निकाल


विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या