PM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करणं अशक्य


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबारमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल


नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशासह राज्यभरात निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. देशभरात सर्व पक्ष व पक्षांचे नेते प्रचारसभा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही महाराष्ट्रात सभा घेतली आहे.


नंदुरबार लोकसभेसाठी (Nandurbar Loksabha) महायुतीतील भाजपाच्या (BJP) उमेदवार डॉ. हिना गावित (Dr. Heena Gavit) यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतील भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली असून या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कर्नाटकात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कर्नाटकात मुस्लिमांना एकाच रात्रीत ओबीसींचे आरक्षण दिले. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.



काँग्रेसच्या यंत्रणांकडून अफवा पसरवल्या जातात


काँग्रेसने गरिबांकडे कधीच लक्ष दिले नाही. आदिवासींचे आरक्षण काढून काँग्रेसने मुस्लिमांना दिले. आरक्षणाचा फायदा काँग्रेस मुस्लिमांना करून देत आहे. काँग्रेसने लिहून द्यावे मुसलमानांना आरक्षण देणार नाही. पण ते लिहून देत नाहीत, तुमचा हक्क लुटण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या यंत्रणांकडून अफवा पसरवण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही.



विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करू शकत नाही


मी काँग्रेसप्रमाणे मोठ्या परिवारातून आलेलो नाही. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे. मोदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही. विकास कामांमध्ये काँग्रेस आमचा सामना करू शकत नाही. वंचित वर्गाच्या अधिकारांचा मी चौकीदार आहे. भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा