नाशिक : राज्यातील कोकण वगळता इतर विभागातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे गुरूवारी आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पुणे, संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहताना पाहायला मिळाला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरही जोरदार पाउस कोसळला. नांदेड सिटी, धायरी, बावधन, कात्रजघाट हायवे मार्गावर पाऊस झाला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासूनच यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी,दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, नेर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचे तापमान हे ४२.५अंशांवर गेले असता अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला लागला असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र,अवकाळी पावसामुळे पालेभाज्या आणि फळबागांचे नुकसानही होत आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस चंद्रपुरात मुसळधार पाऊस अनुभवला जात आहे. गेला महिनाभर चंद्रपूरकर लाही-लाही करणारे ऊन अनुभवत होते. त्यावेळी, पारा ४४.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना गेले दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसाने चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील बिनबा गेट ते आंबेडकर पुतळा मार्गावर पाणी देखील जमा झाले होते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…