RCB vs PBKS: बंगळुरुचा 'विराट' विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ...

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात १० षटकांनंतर गारासोबत जोरदार पाऊस झाला. मात्र काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. यानंतर विराट कोहलीने धावांचा वर्षाव केला. या खेळीच त्याने ४७ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. कॅमेरन ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. ग्रीनने २७ चेंडूत ४६ धावा केल्या.


पंजाब किंग्जचा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने ४ षटकांत ३८ धावांत ३ फलंदाज बाद केले. विद्वथ कावरेप्पा याने २ गडी बाद केले. अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केले.बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २४१ धावांचा डोंगर उभारला आहे. पंजाबला विजयासाठी २४२ धावा कराव्या लागणार आहेत.


बंगळुरुने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर विशेष काही करु शकले नाहीत. बेअरस्टोने १६ चेंडुत २७ धावा करत बाद झाला. तर प्रबसिमरन फक्त ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोसोने संघाची धुरा सांभाळली. त्याने २७ चेंडुत ६१ धावा बनवुन संघाला बळकटी दिली.पण कर्ण शर्माच्या चेंडुवर तो झेलबाद झाला. शशांक सिंग आणि सॅम करनच्या जोडीने पंजाबला आशा दाखवली खरी, पण विराटच्या थ्रोमुळे शशांक रन आऊट झाला. तर फर्गुसनने करनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर बंगळुरुच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक  गडी बाद करत १७ षटकातच पंजाबचा खेळ गुंडाळला. पंजाब १० गड्यांच्या बदल्यात १८१ धावाच बनवु शकले. बंगळुरुचा तब्बल ६० धावांनी विजय झाला.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे