Bhupendra Jogi : 'नाम? भूपेंदर जोगी!' या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्रवर हल्ला!

पाठीला आणि हाताला ४० टाके


भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाखतीदरम्यान म्हटलेल्या 'नाम? भूपेंदर जोगी!' या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्र जोगीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन व्यक्तींनी भूपेंद्रवर हल्ला केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर भूपेंद्रला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे.


युट्युबर भूपेंद्र जोगीचे न्यू मार्केट परिसरात रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो दुकानातून घरी परतत असताना रोशनपुराजवळ दोन तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भूपेंद्र जोगी गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी जखमी भूपेंद्र जोगीला रुग्णालयात नेले. त्याच्या पाठीला आणि हाताला ४० टाके पडले आहेत. या प्रकरणी अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांना गुन्हेगारांची कोणतीही माहिती मिळाली नाही.


भूपेंद्र जोगीने दावा केला आहे की, त्याला दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भूपेंद्रचे कोणाशीही वैर किंवा वाद नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. भूपेंद्र जोगीने त्याचे रुग्णालयातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये भूपेंद्र हा त्याची हेल्थ अपडेट देताना दिसत आहे.



कोण आहे भूपेंद्र जोगी?


'नाम? भूपेंदर जोगी!' या एका मुलाखतीमधील डायलॉगमुळे भूपेंद्र जोगी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या डायलॉगचे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच या डायलॉगवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स देखील बनवले. या मीम्समुळे आणि व्हायरल झालेल्या रिलमुळे भूपेंद्र जोगीला लोकप्रियता देखील मिळाली.

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण