Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

  70

पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल


नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या महितीनुसार, अश्विनी निकुंभ असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन मुलांना विष देऊन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने असे खळबळजनक कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ व बहीण यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये याबाबत व्हिडिओदेखील बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, जन्मदात्यीनेच स्वत:च्या मुलांचा जीव घेत तिने सुसाईड करण्यापूर्वीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १२ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे