BMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे 'या' धोकादायक इमारतींची यादी जाहीर

तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना वेग येतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी ही मान्सूनपूर्व कामं हाती घेण्यात येतात. त्यामध्ये रस्त्यांची तसेच इमारतींची अशा अनेक कामांचा समावेश असतो. यंदाही पालिकेकडून पावसाळा पूर्व कामांची पाहणी झाली असून त्या कामांची यादी जाहीर झाली आहे. पालिकेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले असून त्यात चक्क १८८ इमारतींचा समावेश असल्याचे सांगितले आहे.


पालिकेच्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरातील १८८ इमारती अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे. या इमारतींमध्ये सर्वाधिक, तब्बर ११४ अतिधोकादायक इमारती मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी पश्चिम या भागांमध्ये म्हणजेच शहराच्या पश्चिम उपनगरात आहेत. तर, मुंबई शहरात २७ आणि पूर्व उपनगरात ४७ इमारतींची नोंद पालिकेनं केली आहे.



अशा प्रकारे धोकादायक इमारती ओळखल्या जातात -



  • इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणं, कॉलममधील काँक्रिट पडणं, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखं भासणं, कॉलमला भेगा पडणं.

  • इमारतीचे बीम झुकल्यासारखं वाटणं, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणं, इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल दिसणं.

  • इमारतीच्या आर.सी.सी. चेंबर्स आणि विटांची भिंत यात भेगा दिसणं किंवा त्यांचं काँक्रिट पडणं, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणं.


वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास त्या इमारती धोकादायक असून, नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणत पालिकेच्या सूचनांनुसार इमारत तातडीनं रिक्त करणं गरजेचं असतं. तसेच आजुबाजूच्या इमारतींना याबाबतची सूचना दिली जाणंही आवश्यक ठरत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या