BMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे 'या' धोकादायक इमारतींची यादी जाहीर

तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना वेग येतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी ही मान्सूनपूर्व कामं हाती घेण्यात येतात. त्यामध्ये रस्त्यांची तसेच इमारतींची अशा अनेक कामांचा समावेश असतो. यंदाही पालिकेकडून पावसाळा पूर्व कामांची पाहणी झाली असून त्या कामांची यादी जाहीर झाली आहे. पालिकेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले असून त्यात चक्क १८८ इमारतींचा समावेश असल्याचे सांगितले आहे.


पालिकेच्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरातील १८८ इमारती अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे. या इमारतींमध्ये सर्वाधिक, तब्बर ११४ अतिधोकादायक इमारती मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी पश्चिम या भागांमध्ये म्हणजेच शहराच्या पश्चिम उपनगरात आहेत. तर, मुंबई शहरात २७ आणि पूर्व उपनगरात ४७ इमारतींची नोंद पालिकेनं केली आहे.



अशा प्रकारे धोकादायक इमारती ओळखल्या जातात -



  • इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणं, कॉलममधील काँक्रिट पडणं, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखं भासणं, कॉलमला भेगा पडणं.

  • इमारतीचे बीम झुकल्यासारखं वाटणं, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणं, इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल दिसणं.

  • इमारतीच्या आर.सी.सी. चेंबर्स आणि विटांची भिंत यात भेगा दिसणं किंवा त्यांचं काँक्रिट पडणं, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणं.


वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास त्या इमारती धोकादायक असून, नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणत पालिकेच्या सूचनांनुसार इमारत तातडीनं रिक्त करणं गरजेचं असतं. तसेच आजुबाजूच्या इमारतींना याबाबतची सूचना दिली जाणंही आवश्यक ठरत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.