Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांची घरवापसी; भाजपामध्ये केला पक्षप्रवेश

पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी


मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा भाजपला सुटली आणि या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. भाजप किंवा शिवसेना कोणालाही पालघरची जागा मिळाली तरी उमेदवारी गावितांना मिळेल, असा अंदाज होता. मात्र, भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. यानंतर नाराज असलेल्या गावितांनी हेमंत सावरा यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा आपला मूळ पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केला.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील हजर होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला सुटली. त्यामुळे राजेंद्र गावित यांना उमेदवारीला मुकावे लागले. या सर्व घडामोडींमुळे गावित नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेत आपली नाराजी प्रकट केल्याचे बोलले जात आहे.



कसा होता गावितांचा प्रवास?


राजेंद्र गावित २०१४ साली पालघरमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यानंतर शिवसेनेने पालघरची जागा उमेदवारासहित मागितली. त्यामुळे गावित पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गावितांचा आज भाजपामध्ये पुनर्प्रवेश पार पडला.

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.