Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! २० मे पर्यंत कोठडीत वाढ

सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली


नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. महिना उलटून गेल्यानंतरही केजरीवाल यांची कोठडीतून सुटका झालेली नाही. याउलट त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे, सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) सुनावणी पुढे ढकलल्यामुळे केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये २० मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन देण्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने यावेळी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की की, 'केजरीवाल हे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार देखील करायचा आहे. ही असामान्य स्थिती आहे. तसेच केजरीवाल हे काही वारंवार अपराध करणारे व्यक्ती नाहीत.' न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी घेतली.


केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास ईडीने विरोध दर्शवला होता. यामुळे चुकीचा पायंडा पडेल. तसेच एक सामान्य व्यक्ती आणि एका पदावरील व्यक्तीमध्ये असा भेदभाव करणे योग्य नाही. शेतकऱ्याला शेतात धान्य पेरायचं म्हणून त्याला जामीन मंजूर केला जाईल का, अशा प्रकारचा युक्तीवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला होता.


सुप्रीम कोर्टाने यावर म्हटलं होतं की, 'लोकसभा निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. चार किंवा सहा महिन्यांनी शेतातील पेरणीसारखी ही घटना नाही. ही असामान्य स्थिती आहे. आम्हाला याप्रकरणी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासाठी प्राधान्याने विचार करावा लागेल.' कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय अडीच वाजेपर्यंत राखून ठेवला होता.


केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळण्याची शक्यता होती. पण, तसं होऊ शकलेलं नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २० मेपर्यंत केजरीवाल कोठडीतच असणार आहेत. त्यामुळे हा आपसाठी मोठा धक्का आहे.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर