Sugar Price Hike : तूरडाळ व तांदळाच्या दरवाढीनंतर आता साखरही कडवटणार!

प्रतिकिलो 'इतक्या' रुपयांची दरवाढ


नागपूर : निवडणुकांची रणधुमाळी तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यामुळे देशभरात सध्या साखरेची प्रचंड मागणी आहे. मात्र केंद्र सरकारने निवडणुका लक्षात घेता मे महिन्यात साखरेच्या कोट्यात भरघोस वाढ केलेली आहे. यामुळे ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या (Sugar Price Hike) झळा सहन कराव्या लागणार आहेत. साखरेच्या दरवाढीने किचनमधील गोडवा कमी केला असल्यामुळे सामान्यांना गोडधोड करुन तोंड गोड करणेही आता परवडणार नाही. त्यांना साखरेसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.


सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीस आळा बसावा म्हणूनच हा निर्णय घेतला असून त्याला 'इलेक्शन कोटा' असे म्हटले जाते. केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करीत असते. मे महिन्याचा कोटा केंद्राकडून जाहीर केला असून तो कोटा मुबलक असल्याने साखरेच्या दरात प्रतिकिलो एक ते दोन रुपयांची घसरण अपेक्षित होती. मात्र सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या त्या मनसुब्याला धक्का बसला आहे.


विशेषत: मागील महिन्यात साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने प्रतिकिलो दोन ते अडीच रुपये भाव वाढले होते. इलेक्शन कोट्यानुसार या दरात उतार होण्याऐवजी साखरेचे भाव प्रतिकिलो एक रुपयांनी वाढले आहे. तर लवकरच साखरेच्या दरात सरासरी दोन रुपयांची वाढ होईल अशी चर्चा व्यापारीवर्गात आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता केंद्र सरकारने तब्बल २७ लाख टन साखर खुली केली. कोटा जाहीर होताच भाव कमी होण्याची शक्यता होती. मात्र, त्यात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोटा आणि मागणी लक्षात घेता साखरेच्या बाजारात साठेबाज सक्रिय झाल्याची चर्चा आहे. तसेच अजूनही प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ होण्याची शंका वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना