Nashik Loksabha : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! विजय करंजकरांची बंडखोरी

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप


नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha) महत्त्वाची आहे. या ठिकाणी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ही जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आली. मात्र ठाकरे गटाने विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचा पत्ता कट करत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.


दरम्यान, महायुतीतून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे करंजकरांची ती आशाही मावळली. शिवाय नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या करंजकर यांनी अखेर आज अर्ज दाखल केला आहे.



उद्धव ठाकरेंवर केला आरोप


आपल्याला वर्षभरापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि ऐनवेळी उमेदवारी कापली, असा आरोप विजय करंजकरांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला. त्यामुळे अखेरीस आपण उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्याबरोबर शिवसेनेचे ३५ माजी नगरसेवक आणि चार जिल्हा परिषद सदस्य तसेच काही पदाधिकारी असल्याचेही ते म्हणाले. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह