Nashik Loksabha : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! विजय करंजकरांची बंडखोरी

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप


नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha) महत्त्वाची आहे. या ठिकाणी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ही जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आली. मात्र ठाकरे गटाने विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचा पत्ता कट करत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.


दरम्यान, महायुतीतून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे करंजकरांची ती आशाही मावळली. शिवाय नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या करंजकर यांनी अखेर आज अर्ज दाखल केला आहे.



उद्धव ठाकरेंवर केला आरोप


आपल्याला वर्षभरापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि ऐनवेळी उमेदवारी कापली, असा आरोप विजय करंजकरांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला. त्यामुळे अखेरीस आपण उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्याबरोबर शिवसेनेचे ३५ माजी नगरसेवक आणि चार जिल्हा परिषद सदस्य तसेच काही पदाधिकारी असल्याचेही ते म्हणाले. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे