Delhi Commission for Women : दिल्ली महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन!

आयोगाच्या माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राज्यपालांनी दिले निलंबनाचे आदेश


नवी दिल्ली : दिल्लीच्या महिला आयोगातून (Delhi Commission for Women) एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीचे राज्यपाल व्ही.के.सक्सेना (V. K. Saxena) यांनी महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या कार्यकाळात त्यांनी २२३ महिलांची नियुक्ती नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता केली होती, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर नायब राज्यपालांनी २०१७ मध्ये महिला आयोगाच्या बेकायदेशीर नियुक्ती आणि अनियमिततेच्या मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली.


समितीने २ जून २०१७ रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे आणि नायब राज्यपालांचीही मंजुरी न घेतल्यामुळे निर्माण केलेली २२३ पदे आणि महिला आयोगाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनियमित होती. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने डीसीडब्ल्यू नियम तरतुदींचे उल्लंघन केले, असा आरोप करण्यात आला.


डीसीडब्ल्यूने केलेल्या या सर्व अनियमितता आणि बेकायदेशीरतेची दखल घेऊन नायब राज्यपालांनी नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मंजूर पदांशिवाय आणि योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याने रद्दबात ठरवले.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच