Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती सर्व पोषकतत्वे असतात जी शरीरासाठी गरजेची असतात. प्रत्येक मोसमात आपापली फळे असतात जे खाण्याचा आरोग्यतज्ञ सल्ला देतात. दरम्यान, फळे खाण्याचेही काही नियम आहेत. ते जर पाळले नाहीत तर त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. यातील एक म्हणजे काही फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. जर तुम्ही अशी चूक करत असाल तर यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकते.



सफरचंद


सफरचंद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र जर सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर ते फायबर आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच पचनाचे काम व्यवस्थित होत नाही.



कलिंगड


उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. अशातच तुम्ही जर कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिले तर शरीरास नुकसान पोहोचू शकते.



टरबूज


टरबूजालाही उन्हाळ्यात मोठी पसंती दिली जाते. हे रसदायक असे फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.



केळी


केळी खाण्याचे फायदे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. यात हेल्दी फॅट्स, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. मात्र केळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे ब्लड शुगरचा त्रास होऊ शकतो.



जांभूळ


जांभूळ हे अतिशय फायदेशीर आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये अनेक फायदेशीर गुण लपले आहेत.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे