China landslide : चीनमध्ये भूस्खलनामुळे महामार्ग कोसळला !

भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी


बेईजिंग : चीन (China) देशाला आधीपासूनच अनेक दुर्घटनांना, नैसर्गिक आपत्तींना (Natural calamity) तोंड द्यावे लागले आहे. तिथल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे अनेकदा त्सुनामी, पूर, तर कधी भूकंप अशा आपत्ती त्या ठिकाणी येत असतात. त्यातच आज पुन्हा एक दुर्घटना घडली आहे. चीन ग्वांगडोंग प्रांतात भूस्खलनामुळे (Landslide) महामार्गाचा एक भाग कोसळला. या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातामुळे एकूण १८ वाहने घसरली, ज्यामध्ये एकूण ४९ लोक होते. यातील १९ लोकांचा मृत्यू झाला आणि ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.





ग्वांगडोंगमधील मीडा एक्सप्रेसवेवर डाबू ते फुजियानच्या दिशेने, चायांग विभागाच्या बाहेर पडण्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर हा महामार्गाचा भाग कोसळला. कोसळलेला रस्ता सुमारे १७.९ मीटर लांब आहे आणि सुमारे १८४.३ चौरस मीटर क्षेत्र व्यापतो.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)