Thane Loksabha : अखेर ठाणे लोकसभा शिवसेनेचीच! कोणाला मिळाली उमेदवारी?

कल्याणमधूनही श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर


ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवरुन (Thane Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. अखेर भाजपाने सामंजस्याची भूमिका घेत ही जागा शिवसेनेला दिली आहे. या ठिकाणी शिवसेनेचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याण लोकसभेची (Kalyan Loksabha) जागा देखील शिवसेनेला देण्यात आली असून या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.





उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, ठाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नव्हता. आता तोही सुटला असून नरेश म्हस्के लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा