TV Star Anupama : अनुपमाचा राजकारणात प्रवेश; भाजपाला दिली साथ!

विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा


मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक बड्या बड्या नेत्यांनी भाजपात (Bhartiya Janta Party) प्रवेश केला. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींनीही राजकारणात प्रवेश करताना भाजपची साथ दिली. त्यातच आता 'अनुपमा' मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या एका अभिनेत्रीने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश पार पडला. रुपाली गांगुली (Rupali Ganguly) असं या अभिनेत्रीचं नाव असून त्यांच्यासोबत अमेय जोशी यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.


रुपाली गांगुली या सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील त्यांची ही मालिका खूप चर्चेत आहे. या पक्षप्रवेशावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप मोठी चाहती आहे. आपल्या देशातील विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही वाटलं यात मी सहभागी झालं पाहिजे म्हणून मी हा पक्षप्रवेश केला. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे."


भारतीय जनता पक्षाचे सचिव असलेले नेते विनोद तावडे यांनीही यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. "विरोधी पक्ष आपल्या प्रचारात खोटं पसरवत आहे. 'मत जिहाद' करण्यापर्यंत काँग्रेस आता पोहोचली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल. दोघांचंही भाजपमध्ये स्वागत. " असं ते यावेळी म्हणाले.



कोण आहेत रुपाली गांगुली?


रुपाली या ही बंगाली कुटूंबातून आल्या असून त्यांचे वडील अनिल गांगुली हे दिग्दर्शक होते तर त्यांचा भाऊ विजय हा नृत्यदिग्दर्शक आहे. 'साहेब' या सिनेमातून रुपाली यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं. तर सुकन्या या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. पण त्यांना ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील 'संजीवनी' या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी डॉ. सिमरन ही खलनायकी ढंगाची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप गाजली. तर त्यांची भाभी ही मालिकाही लोकप्रिय ठरली. अनुपमा ही मालिका तर सध्या धुमाकूळ घालत आहे. काही काळाने नेहमीच्या सास-बहू प्रकारातील मालिकांमधून बाहेर पडत त्यांनी 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेत काम केलं.


Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे