मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक बड्या बड्या नेत्यांनी भाजपात (Bhartiya Janta Party) प्रवेश केला. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींनीही राजकारणात प्रवेश करताना भाजपची साथ दिली. त्यातच आता ‘अनुपमा’ मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या एका अभिनेत्रीने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश पार पडला. रुपाली गांगुली (Rupali Ganguly) असं या अभिनेत्रीचं नाव असून त्यांच्यासोबत अमेय जोशी यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.
रुपाली गांगुली या सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील त्यांची ही मालिका खूप चर्चेत आहे. या पक्षप्रवेशावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप मोठी चाहती आहे. आपल्या देशातील विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही वाटलं यात मी सहभागी झालं पाहिजे म्हणून मी हा पक्षप्रवेश केला. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे.”
भारतीय जनता पक्षाचे सचिव असलेले नेते विनोद तावडे यांनीही यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. “विरोधी पक्ष आपल्या प्रचारात खोटं पसरवत आहे. ‘मत जिहाद’ करण्यापर्यंत काँग्रेस आता पोहोचली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल. दोघांचंही भाजपमध्ये स्वागत. ” असं ते यावेळी म्हणाले.
रुपाली या ही बंगाली कुटूंबातून आल्या असून त्यांचे वडील अनिल गांगुली हे दिग्दर्शक होते तर त्यांचा भाऊ विजय हा नृत्यदिग्दर्शक आहे. ‘साहेब’ या सिनेमातून रुपाली यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं. तर सुकन्या या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. पण त्यांना ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील ‘संजीवनी’ या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी डॉ. सिमरन ही खलनायकी ढंगाची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप गाजली. तर त्यांची भाभी ही मालिकाही लोकप्रिय ठरली. अनुपमा ही मालिका तर सध्या धुमाकूळ घालत आहे. काही काळाने नेहमीच्या सास-बहू प्रकारातील मालिकांमधून बाहेर पडत त्यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत काम केलं.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…