School Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

महाराष्ट्रात ६६१ तर मुंबईत १८६ बेकायदेशीर शाळा, नवी मुंबईतही ५ शाळा अनधिकृत


नवी मुंबई : नवी मुंबईमधील (Navi Mumbai) शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणाऱ्या (School Admission) पालकांना नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सावध केले आहे. राज्याची कोणतीही मान्यता नसलेल्या अनधिकृत अशा पाच शाळा नवी मुंबई शहरात सुरू आहेत व अशा शाळांमध्ये आपल्या मुलासाठी प्रवेश घेणे टाळा, असे पालिकेने म्हटले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. बेकायदा घोषित केलेल्या या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.


महानगरपालिकेने या शाळांमध्ये प्रवेश (School Admission) घेऊ नये असे सांगितले आहे. तसेच या शाळांमध्ये आधीच शिकत असलेल्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.


या शाळांना, शिक्षण हक्क कायद्यानुसार परवानग्या मिळवा किंवा दंडात्मक कारवाईसाठी तयार राहा, अशा सूचना देणाऱ्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.


दरम्यान याआधी डिसेंबर २०२३ मध्ये, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी उत्तरात माहिती दिली होती की, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ६६१ शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली असून खासगी संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत सुरू असलेल्या १८६ बेकायदेशीर शाळांची माहिती त्यांच्या विभागाकडे असल्याची पुष्टीही केसरकर यांनी केली होती.



अनधिकृत घोषित केलेल्या शाळांची यादी



  • अल मोमिना स्कूल, बेलापूर.

  • इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ.

  • ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, सीवूड्स.

  • शालोम प्रायमरी स्कूल, तुर्भे.

  • इलिम इंग्लिश स्कूल. रबाळे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला