MI vs LSG: स्टॉयनिसच्या खेळीने लखनौ विजयी, रोहितच्या वाढदिवशी हारली मुंबई...

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून नेहल वढेराने 46 धावांची खेळी केली तर टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.


लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करत मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी केली होती. त्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि नेहलने 53 धावांची भागीदारी रचत मुंबईला 80 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र इशान किशन 32 धावा करून बाद झाला.

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून मार्कस स्टोयनिस याने 62 धावांची खेळी केली. स्टोयनिसने लखनऊसाठी सर्वाधिक धावा केल्या. तर कॅप्टन केएल राहुल याने 28 धावा जोडल्या. दीपक हुड्डाने 18 रन्स केल्या. एश्टन टर्नर याने 5 आणि आयुष बदोनीने 6 रन्स केल्या. मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर नुवान तुशारा, जेराल्ड कोएत्झी आणि मोहम्मद नबी या तिघांनी 1-1 विकेट घेतली. तर निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या या जोडीने लखनऊला विजयी केलं. निकोलसने नाबाद 14 धावा केल्या. तर कृणाल 1 रन करुन माघारी परतला.

 

 
Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक