U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या पराभवामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी बीसीसीआयकडून संपूर्ण संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.


अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून तब्बल १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ निर्णायक सामन्यात मात्र पूर्णपणे कोलमडलेला दिसला. गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकली नाही, तर फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे बीसीसीआयकडून केवळ आढावा घेण्यापुरते न थांबता, टीम मॅनेजमेंटकडून पराभवाबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागवले जाणार आहे.


आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना एकही सामना गमावला नव्हता. मात्र, विजेतेपदाच्या सामन्यात संघाचा आत्मविश्वास ढासळलेला दिसला. निर्णायक क्षणी अनुभवी आणि आघाडीच्या खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी न केल्याने संघावर दबाव वाढत गेला.


बीसीसीआय अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याशी अंतिम सामन्यातील कामगिरीवर थेट चर्चा करणार आहे. ही चर्चा टीम परफॉर्मन्स रिव्ह्यूचा महत्त्वाचा भाग असणार असून, भविष्यातील धोरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या वर्तणुकीबाबतही बीसीसीआयने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि आवश्यक असल्यास कारवाईचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र, हा मुद्दा अधिकृत रिव्ह्यू प्रक्रियेचा भाग आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.


भारतीय अंडर-१९ संघाला येत्या काळात झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. त्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नसल्याने, विश्वचषकापूर्वीच आशिया कपमधील पराभवाचा आढावा पूर्ण करण्यावर बीसीसीआयचा भर आहे. भविष्यात अशा मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागू नये, यासाठी ही समीक्षा महत्त्वाची मानली जात आहे.


Comments
Add Comment

IPL Playoff 2026 : RCB, GT, SRH आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने

IPL मध्ये लाजिरवाणी घटना! चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार ; मैदानातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

Sara Tendulkar : अर्जुनच्या पदार्पणाने तेंडुलकर कुटुंब भावूक; बहिण सारा आणि पत्नी सानियाची खास पोस्ट चर्चेत

IPL 2026 LSG VS PBKS : आयपीएल २०२६ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरच्या मुलाला लखनउ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली.

KKR vs DC : आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने, केकेआरकडे प्लेऑफमध्ये जाण्याची शेवटची संधी

IPL 2026 : आयपीएल 2026 मधील लीग टप्प्यातील अखेरचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना