Nagpur News : धक्कादायक! लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच थांबला जीवनप्रवास!

पत्नीला म्हणाला, काम आटपून येतो आणि... नेमकं काय घडलं? 


नागपूर : कुणाचे नशीब कधी बदलेल आणि काळाचा घाव कधी पडेल काही सांगता येत नाही. आयुष्यात लग्नगाठ बांधून आपल्या जोडीदारासोबतचा जीवनप्रवास करणे सुखकारी असते. मात्र हा सुखी प्रवास सुरु होताच संपणे म्हणजे काळाने केलेला घात. अशीच एक ह्रदयद्रावक घटना नागपूर येथे घडली आहे. नुकतेच लग्न झालेल्या वराचा लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात होऊन त्याचे प्राण गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


निखिल विद्याधर हर्षे (३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी हा तरूण लग्नसमारंभातून मोकळा होऊन काही कामानिमित्त बाहेर पडला होता. जबलपूर ते नागपूर आउटर रिंगने जात असताना समोरुन येणाऱ्या एका भरधाव वाहनाची धडक लागली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला असता त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले.


दरम्यान, अपघातात समोरील अज्ञात आरोपी वाहन चालक पळून गेला. या अज्ञात वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोध सुरु केला आहे. तत्पूर्वी पत्नीला काम आटपून येतो असे सांगून निघालेला निखिल स्वत: न परतता त्याचे पार्थिवच घरी पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या