संपूर्ण जीवनात एक तरी विकास काम केलेले दाखवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आव्हान


सोलापुर : उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले विकासाचे एक काम तरी सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरे यांनी एक तरी विकास काम केलेले दाखवावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


सोलापुरात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा झाली. या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जीवनात एक तरी विकास काम केलेले आहे का? ते मला दाखवा. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी होते. मात्र, त्यांनी विकासाचे कुठलेच काम केले नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. संजय राऊत ही व्यक्ती कोण आहे? ते मला माहिती नाही. पण ठाकरेंनी मी म्हणजेच महाराष्ट्र आहे, या मानसिकतेतून बाहेर यायला हवे, अशी टीका त्यांनी केली.


भारतीय जनता पक्ष धार्मिक प्रचारात गुंतला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला होता. त्यांना आजही राम नाव वापरावे लागत असल्याचे ते म्हणाले होते. याला देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही राम - राम करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये राम राम नाही म्हणायचे तर पाकिस्तानात म्हणायचे का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आम्ही राम राम म्हणणारच, असे देखील फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या