सोलापुर : उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले विकासाचे एक काम तरी सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरे यांनी एक तरी विकास काम केलेले दाखवावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सोलापुरात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा झाली. या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जीवनात एक तरी विकास काम केलेले आहे का? ते मला दाखवा. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी होते. मात्र, त्यांनी विकासाचे कुठलेच काम केले नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. संजय राऊत ही व्यक्ती कोण आहे? ते मला माहिती नाही. पण ठाकरेंनी मी म्हणजेच महाराष्ट्र आहे, या मानसिकतेतून बाहेर यायला हवे, अशी टीका त्यांनी केली.
भारतीय जनता पक्ष धार्मिक प्रचारात गुंतला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला होता. त्यांना आजही राम नाव वापरावे लागत असल्याचे ते म्हणाले होते. याला देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही राम – राम करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये राम राम नाही म्हणायचे तर पाकिस्तानात म्हणायचे का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आम्ही राम राम म्हणणारच, असे देखील फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…