Summer Hair Care : उन्हाळ्यात केसांची काळजी सतावते आहे का? मग घ्या केसांची 'अशी' काळजी

मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र झळांमुळे त्वचा आणि केसांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घेणे गरजेचे आहे. ऊन, धूळ आणि घामामुळे केस लगेच खराब व चिकट होऊन जातात. त्यामुळे, केस कोरडे आणि खराब दिसू लागतात. सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केवळ आरोग्यच नाही तर केसांनाही हानी पोहचते. त्यामुळे उन्हाच्या दिवसांत आरोग्यासोबत केसांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असते.


सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केसांमधील क्युटिकल नष्ट होतात. ज्यामुळे, केस तुटू लागतात तसेच उन्हामुळे केसांचा रंग ही उडतो. त्यामुळे, केस मोठ्या प्रमाणात खराब होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केसांची खास काळजी घेण्यासाठी असे काही सोपे उपाय करु शकता.



केसांना हेअर मास्क लावा


केस कोरडे होणे आणि केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता. हेअर मास्क हा केसांसाठी एक प्रभावी उपाय आहे. हेअर मास्कमध्ये शीया बटर आणि आर्गन ऑईलसारखे डीप कंडिशनिंग एजंट असतात. ज्यामुळे, केसांना छान फायदा होतो. हा हेअर मास्क तुम्ही केसांना शॅम्पू करण्यापूर्वी लावू शकता किंवा केसांना शॅम्पू केल्यानंतर ही केसांना लावू शकता.



कंडिशनर लावा


केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. यामुळे, केस मुलायम होण्यास मदत होते आणि ओले केस वाळल्यानंतर त्यातील गुंता कमी होतो. शिवाय, केसांना छान पोषण ही मिळते. या व्यतिरिक्त केसांना कंडिशनर लावल्यामुळे केसगळती आणि केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या कमी होते.



स्कार्फचा वापर करा


उन्हाळ्यात केसांची देखभाल करण्यासाठी आणि केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा अवश्य वापर करा. स्कार्फचा वापर केल्यामुळे केसांचा आणि त्वचेचा उन्हापासून बचाव केला जाईल. त्यामुळे, उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना स्कार्फ बांधा, यामुळे केस खराब होणार नाहीत.



मोठ्या कंगव्याचा करा वापर


उन्हाळ्यात तुमच्या केसांसाठी रूंद-दात असलेला कंगव्याचा वापर अवश्य करा. कंगव्याने केस विंचरण्यापूर्वी केसांना हेअर सीरम लावा. यामुळे, केस तुटणार नाहीत. ओल्या केसांवर कधीच कंगव्याचा वापर करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. केस वाळल्यानंतर ते कंगव्याने विंचरा.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता