Water Supply : मुंबईकरांवर पाणीबाणी! 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

'पाणी जपून वापरा' असे आवाहन


मुंबई : सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता मुंबईकरांनाही पाणीबाणीच्या संकटाला समोर जावे लागणार आहे. मे महिन्यात मुंबईमधील कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं व बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.


मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. हे काम पुढील आठवड्यात गुरुवार, २मे ते शुक्रवार, ३मे रात्री १० या वेळेत करण्यात येणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी बंद असलेल्या जलवाहिनीचे २४ तासांत अलगीकरण करण्यात येणार आहे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा असेल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पालिकेने सांगितले.



या भागात पाणीपुरवठा बंद-



  • गांधी नगर, संजय नगर, लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, , सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, बंदर पखाडी, भाबरेकर नगर या परिसरात शुक्रवारी ३ मे रोजी पाणी येणार नाही.

  • जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या परिसरात देखील ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

  • चारकोप म्हाडा सेक्टर – ०१ ते ०९ मध्ये ३ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णता बंद असणार आहे.

  • आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम), महावीर नगर, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, म्हाडा एकता नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण येथे गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


Comments
Add Comment

Mumbai Crime: मुंबईत खळबळ! RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ACB च्या जाळ्यात; 4 हजारांची लाच घेताना अटक

Crime News: सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे प्रादेशिक

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक वाहतुकीला

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

जेजुरीत भाविकांना दिलासा! भंडारा खरेदीसाठी सक्ती करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

जेजुरीच्या खंडोबा (Khandoba) मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जेजुरी

कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडाली आहे.

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार