Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी


मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मुंबईत काँग्रेसला (Congress) प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. मुंबईत काँग्रेसचा चेहरा मानल्या जाणार्‍या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम यांचा समावेश होता. तर अनेक वर्षे काँग्रेससोबत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला आसतानाच आता आणखी एक समस्या उभी ठाकली आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसचा एक नेता प्रचंड नाराज झाला आहे. या नाराजीतून त्याने स्टार प्रचारकपदाचा थेट राजीनामा दिला आहे.


मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan) हे हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी हा राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.



नसीम खान यांनी काँग्रेस हायकमांडला स्पष्ट सांगितलं, म्हणाले...


नसीम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती. तीदेखील मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. मी पक्षाचा आदेश मानून लगेच तयारी सुरु केली होती. मात्र, आता या जागेवरुन वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको


काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज नाराज आहे, मी देखील नाराज आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. शेवटी मी पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे, असे नसीम खान यांनी म्हटले.

Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या