Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी


मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मुंबईत काँग्रेसला (Congress) प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. मुंबईत काँग्रेसचा चेहरा मानल्या जाणार्‍या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम यांचा समावेश होता. तर अनेक वर्षे काँग्रेससोबत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला आसतानाच आता आणखी एक समस्या उभी ठाकली आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसचा एक नेता प्रचंड नाराज झाला आहे. या नाराजीतून त्याने स्टार प्रचारकपदाचा थेट राजीनामा दिला आहे.


मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan) हे हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी हा राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.



नसीम खान यांनी काँग्रेस हायकमांडला स्पष्ट सांगितलं, म्हणाले...


नसीम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती. तीदेखील मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. मी पक्षाचा आदेश मानून लगेच तयारी सुरु केली होती. मात्र, आता या जागेवरुन वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको


काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज नाराज आहे, मी देखील नाराज आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. शेवटी मी पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे, असे नसीम खान यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या

शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

मुंबई : शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला आहे. काँग्रेसच्या या

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच

पूल वाचवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे पूल वाचवल्यास प्रकल्प खर्च आणि कालावधीही

मुंबई, पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा तर २० राज्यांना आठवडाभर पाऊस झोडपणार मुंबई (प्रतिनिधी): दोन

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार